|| तमसो मा ज्योतिर्गमय ||
मित्रांनो , आज हि बऱ्याच घरांमध्ये रोज नित्यनियमाने एका विशिष्ट वेळी देवा सोमोर दिवा किंवा मेणबत्ती लावली जाते. का ? अहो इथे तेल महाग झालंय तरी का पेटवता दिवा ? काय असतं मनात त्या वेळेस ? हेच असेल नक्की कि काही होणार नाही दिवा वगैरे लावून ... उगाच लावायचा म्हणून लावतोय ... काही उपयोग नाही. मला एक तर किती त्रास आहे .. कर्ज आहे , कामाचा व्याप आहे , मुलीच्या लग्नाचं टेन्शन , आई वडीलांचं आजारपण , बापरे हे सगळं असताना मी काय देवा समोर दिवा लावतोय , उदबत्ती लावतोय , मेणबत्ती लावतोय .... मला माझं प्राधान्य कळत नाही .... वेडे आहेत मला हे रोज करावं असं सांगणारे किंवा सांगून गेलेले... बावळट होते माझे वाड-वडील आणि मीही तेवढाच बावळट आहे कारण माझ्या मुलांकडून पण मी हीच अपेक्षा करतो कि त्यांनी हि दिवा बत्ती करावं देवा समोर .. कि असा विचार करता कि आज दिवसभर जे झालं ते झालं... पण देवा समोर दिवा लावला , अगरबत्ती , मेणबत्ती लावली कि मन प्रसन्न होतं , एक सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते आणि घरातील सगळे एकत्र येण्याचा आणि प्रार्थना करायचा तो एक अनमोल क्षण असतो ... भले तो २ , ३ , ४ किंव...